राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह या वर्षी दि. 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2017 दरम्यान साजरा करण्यात आला. अनेक स्वयंसेवी संस्था, शासकीय विभाग, निमशासकीय संस्था नावीन्यपूर्णरीत्या जनजागृतीचे कार्य करीत आहेत. समाजाने या अभियानात अधिकाधिक सक्रिय झाले पाहिजे.
दरवर्षी होणार्या अपघातांची तीव्रता समजून घेण्यासाठी आपण पुढील आकडेवारी पाहूया...
सन 2015 मध्ये तेरा प्रमुख राज्यांमध्ये झालेल्या अपघातांची संख्या खरंच काळजी करावी इतकी अधिक आहे. यामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक असून, 2015 मध्ये तब्बल 63 हजार 805 मृत्यू केवळ रस्ता अपघातात नोंदविले गेले आहेत. तमिळनाडू राज्यात सर्वाधिक अपघात झाले आहेत. त्यांनतर
मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो. एका वर्षात संपूर्ण भारतात तब्बल 5 लाख अपघात नोंदविले गेले आहेत. यामध्ये 1 लाख 46 हजार नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले आहे, तर याच्या तीन पट नागरिक जखमी आहेत. यामधील वाढत जाणारी संख्या पाहता, फक्त यामध्ये आकडेवारीनुसारच नाही, तर दीर्घकालीन परिणामसुद्धा गंभीर आहेत, याचा अधिक विचार झाला पाहिजे.
हे सारे टाळायचे, तर आपण काय करू शकतो?